परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…
पुढे वाचाCategory: Featured
Read latest Marathi Featured Articles published in Chaprak Masik or Diwali ank.
अंतर्मुखता हे सामर्थ्य
त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…
पुढे वाचाप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल
सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…
पुढे वाचापेचक
कॅमेर्याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव
जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…
पुढे वाचामुडदा बशिवला मेल्याचा!
कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…
पुढे वाचाअधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे
मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही. गेल्या काही वर्षात…
पुढे वाचाजन्मभरी तो फुलतचि होता…
जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात्र त्यांच्या साहित्यिक योगदानातून हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी कायम धगधगत आहे. कुणी शाईने लिहिली कविता कुणी रक्ताने लिहिली कविता करी…
पुढे वाचागांधीजींचे पुनरागमन
गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा… विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते.
पुढे वाचाअशी ही सातार्याची तर्हा
‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर औरंगजेबाला शूर मराठ्यांनी झुंजवलं, त्याच्या मोगल साम्राज्याला खग्रास ग्रहण लागलं तेही याच परिसरात! १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या निधड्या-निर्भय सहकार्यांनी ‘ब्रिटिशांची’ सत्ता उखडून टाकून ‘पत्री सरकार’ स्थापन केलं होतं, तेही याच परिसरात!…
पुढे वाचा