उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य… महाराष्ट्र! – संजय सोनवणी

जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्त्व जबाबदार असते.

पुढे वाचा

श्रीमंत योगी

श्रीमंत योगी

उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.

पुढे वाचा

गोष्ट गुगलची

Gosht-Googlechi by Ganesh Aatkale

या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकायला मिळते, ते म्हणजे गुगल करणे! अर्थात ‘गुगल’वर शोधणे. गुगल या कंपनीचं नाव माहीत नसलेला एक साक्षर माणूस सापडणार नाही, अगदी असंच गुगलबद्दलचं चित्र आहे. आजच्या युगात गुगल म्हणजे एक माहितीचं भांडार आहे. कशाबद्दलही माहिती शोधायची असली की मग गुगल उघडा, अगदी इंटरनेट चालू आहे की नाही हेही तपासण्यासाठी लोक गुगलच उघडतात. एखादं ठिकाण शोधायचं असेल, मग गुगल मॅप्स वापरा. कोणतं पुस्तक मिळवायचं असेल तर गुगल बुक्स वापरा. ई-मेल खातं उघडायचं असेल गुगलचेच जीमेल वापरा. इंटरनेटवर एखादा…

पुढे वाचा

संवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?

‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.

पुढे वाचा

बी पॉझिटिव्ह

असं म्हणतात आयुष्यात दोन-चार ठेचा खाल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. जो चुकतो तोच शिकतो आणि पुढे जातो. जो चुकतो पण शिकत नाही तो तिथंच राहतो आणि जो कधी चुकतच नाही तो माणुसच नसतो.

पुढे वाचा