विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना काळाभोर कलप लावलेला. तसेच मिशीलाही. डोळ्यांवर रूबाबदार चष्मा. अंगात सफारी. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांनीही काही दिवस जाकीट वापरून पाहिलं. त्यात त्यांना अवघडल्यागत वाटू लागलं. त्यांनतर त्यांनी छानशा कपड्याचा सफारीच वापरायला सुरूवात केली. सफारीत एक वाईट…
पुढे वाचाCategory: Featured
Read latest Marathi Featured Articles published in Chaprak Masik or Diwali ank.
‘परंपरा’ नको, ‘अभिमान’ बाळगा
‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे मी एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’ अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे…
पुढे वाचाप्रथा – परंपरा नाकारताना!
कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं… ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांची.
पुढे वाचालाल पाणी
दोघी मैतरणी दोघी यकाच जीवाच्या यक फांदी यक फूल दोघी यकाच रूपाच्या
पुढे वाचाकौसल
फाटकावर थांबूनच त्याने हवेली डोळाभर न्याहाळली. मोठ्या झाडाची पानगळ झाली तरी त्याचा भक्कमपणा गळत नसतो असंच काहीसं वाटलं त्याला. हवेलीचं जुनं वैभव जरी खंगलं होतं तरी तिची ऐट काही कमी झाली नव्हती. श्रीमंती उपभोगलेल्या किंचित प्रौढ बाईसारखी वाटत होती ती. ‘‘कलेक्टर साहेबानं पाठवलं का तुम्हाला?’’ कुणीतरी त्याला बोललं म्हणून तो भानावर आला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. एक म्हातारा माणूस, अरे हे तर दामूअण्णा! ‘‘हो.’’ ‘‘या साहेब, या’’ असं म्हणत दामुने त्याची बॅग घेतली अन् वाड्याकडे चालू लागला. तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. ‘‘किती दिवस थांबावे लागेल?’’ ‘‘दोन-चार दिवसात होतील सगळे व्यवहार.’’
पुढे वाचाहे देवाघरचे देणे!
प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?
पुढे वाचा‘परदेशस्थ’ मुलीचं पत्र
हाय आई अणि बाबा, कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील आणि तुम्ही त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची , गाण्याचे कार्यक्रगेट टुगेदर्स, जिम वगैरे मध्ये बिझी व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, ऍक्टिव्हिटीज मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा…
पुढे वाचालेखणीच्या बळावर आर्थिक झेप कशी उंचावणार?
महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही. गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः आधुनिक गद्य लेखनाला सुरूवात झाल्यानंतर ते आजअखेर केवळ साहित्यावर उपजिविका चालविणारे अत्यंत अल्प लेखक होऊन गेले.…
पुढे वाचाएकमेवाद्वितीय
मराठी माणूस जागतिक स्तरावर जाऊ शकतो, हे ज्या थोडक्या लोकांनी सिद्ध केलं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ‘आकाशात देव आहेत आणि पृथ्वीवर लताचा स्वर आहे’ असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व, राहणीमान अत्यंत साधं होतं. भक्तीगीतं, भावगीतापासून ते उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यांच्या व्यक्मितत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या नायिकेसाठी गायच्या तिच्यासोबत त्यांचा आवाज जुळायचा. ‘ज्यांच्यासाठी गायचं त्यांच्यासाठीच हा आवाज योग्य आहे’ अशी किमया चित्रपटक्षेत्रात आजवर दोघांनीच घडवून दाखवली. पहिले होते किशोरकुमार आणि दुसर्या लतादीदी! एक अलौकिक आणि दैवी सामर्थ्य असलेली ही गायिका होती. त्यांनी…
पुढे वाचासराव थांबला, साक्षात्कार हुकला…
आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात.
पुढे वाचा