राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदाच झालाय. भारतीय राज्यव्यवस्थेत तर राजकारणाइतके बदनाम दुसरे कुठलेही क्षेत्र नाही. महाराष्ट्रातील विख्यात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी एका व्यंगकथेच्या माध्यमातून समकालीन राजकीय व्यवस्थेवर केलेले भाष्य – विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना…
पुढे वाचाTag: marathi katha
मागे वळून पाहताना
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.
पुढे वाचास्वप्नविक्या
सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत तो गावात आला. लोकांना वाटलं की ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच. लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय? लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते.
पुढे वाचाआभास
शिरपूर, जि. धुळे येथील लेखिका सौ. शिल्पा प्रसन्न जैन यांचा ‘आभास’ हा कथासंग्रह ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार सुभाषदादा कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या वेबसाईटला जरूर भेट द्या.
पुढे वाचाकुरुक्षेत्र
चपराक दिवाळी अंक 2020 अॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.
पुढे वाचासमंजस
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्याबरोबर उसळणार्या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्या कॅनव्हासवर उतरू लागला.…
पुढे वाचाव्हायरस..!!
शिरीष देशमुख, मंगरूळ, जि. जालना साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2020 अंक मागवण्यासाठी संपर्क – 7057292092 ‘‘हायलो…’’ आबांनी थरथरत्या हातानं मोबाईल कानाला लावला. ‘‘आबा, मी सतु बोलतोय…’’ समोरून त्यांचा मुलगा बोलत होता.
पुढे वाचाबाभूळकांड
ऐश्वर्य पाटेकर युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक. 9822295672 मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019 वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या असतील, त्याही कुणी पाहू नये! ही न पटण्यासारखी सबब. शेवटी पक्ष्यांचं जग माणसांच्या दृष्टिनं अतिशय क्षुल्लक!…
पुढे वाचा