प्रत्येक क्षणाची मजा घेतली – गौरव चाटी

भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय. 25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रियाज करायचो.

पुढे वाचा

आजि नवस हे फळले नवसी

Dr. Pooja Bhavarth Dekhne

प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आमच्या नानांच्या परिवारात तर मला ‘मीराबाई’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे जशी मी मोठी झाले तशी साहजिकच प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा असे, की…

पुढे वाचा

माझा आवडता तिरंगा!

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता.  मी आणि माझा नातू भारत सामना पाहण्यासाठी कारमध्ये बसून निघालो. भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती.     मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहर्‍यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून लक्ष वेधून घेत होते.

पुढे वाचा

मी आणि आई

‘मला मुलगी होणार, 15 ऑगस्टला होणार आणि मी तिला नृत्य शिकवणार!’’ मम्मी बोलत होती. आजी म्हणत होत्या, ‘‘अगं शोभा, आत्ता तुझी प्रकृती पाहता बाळाचा जन्म 15 ला नाही होणार…’’ पण मम्मी ठाम होती! आणि झालेही तसेच! मुलगी झाली, 15 ऑगस्टला झाली आणि फक्त शिक्षण नाही तर आयुष्यच नृत्यासाठी दिले गेले… इतकी ताकदीची इच्छाशक्ती होती माझ्या मम्मीची आणि ती मुलगी मी… संयोगिता…

पुढे वाचा

धक्का – संजय संत 

आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‌‘धक्का‌’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्‌‍प्रचार वेगळ्या अर्थाने रूढ आहे. जहाजे कवा गलबते, छोट्या होड्या यांच्या जाण्या-येण्याच्या  काठाला सुद्धा ‌‘धक्का‌’ असेच…

पुढे वाचा

समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण

subhavbhajan shantaram maharaj nimhan

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख.

पुढे वाचा

हळवा कोपरा – प्रस्तावना

संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.

पुढे वाचा

कस्तुरीगंध – प्रस्तावना

प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा गंध साहित्यक्षेत्रात सर्वत्र दरवळतोय आणि एक अनोखे चैतन्य निर्माण करतोय. या संग्रहातील कथा वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच साहित्याच्या प्रांतात या कथासंग्रहाच्या रुपाने दमदार भर पडली…

पुढे वाचा

विनोबांची शिक्षणछाया – प्रस्तावना

युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’ हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील? तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!

पुढे वाचा