मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

पुढे वाचा

स्वप्नविक्या

सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत  तो गावात आला. लोकांना वाटलं की  ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.  लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?  लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते. 

पुढे वाचा

साहेब निर्मितीचे कारखाने

छोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही! नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद! झिंदाबाद!’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक करणार्‍या गुलामीच्या भक्तिभावाने नवे नवे आपले साहेब निर्माण करत असतो.  घराबाहेर पडलो, भल्या सकाळीच. जरा बर्‍या हवेत फिरायला म्हणून! पण काल रात्री जे नव्हतं ते अचानक घराबाहेरच्या चौकात प्रकटलं होतं. ते होतं महाप्रचंड पोस्टर. अगदी नुकतंच मिसरूड गर्द होत चाललेल्या तरूणाचा चेहरा…

पुढे वाचा

सारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व 

काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारताचे नंदनवन संबोधल्या जाणार्‍या या राज्याविषयी बालपणापासूनच भलतंच कुतूहल आणि आकर्षण वाटायचं. हिमशिखरांनी वेढलेल्या पर्वतराजी, डोंगरावरून वाहणार्‍या खळाळत्या नद्या, सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी, मनोहारी फुलांनी बहरलेले विस्तीर्ण बगीचे, तलाव, विहरणारे शिकारे, हाऊसबोट, सफरचंदांनी लगडलेल्या बागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा या नंदनवनात राहणारे आमचे काश्मिरी बांधव! जन्माला आल्यावर एकदा तरी ह्या नंदनवनाला आवर्जून भेट द्यावी असे वाटायचे. आजवर कधीही काश्मीरबद्दल आकर्षण तर कमी झालं नाहीच पण धुमसत्या काश्मीरबद्दल ऐकल्यावर मात्र वाटलं, ‘हाच का तो आपला स्वर्ग? आपलं नंदनवन? कोणाची नजर तर लागली नाही…

पुढे वाचा

सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते… ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह…

पुढे वाचा

चपराकचा अनोखा अमृत महोत्सव

वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…

पुढे वाचा

वारी एक समाजसंस्कार

परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…

पुढे वाचा

अंतर्मुखता हे सामर्थ्य

त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…

पुढे वाचा

भाषणांची पन्नास वर्षे!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…

पुढे वाचा

प्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल

सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्‍यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…

पुढे वाचा