पहिलटकरणी – सुधीर जोगळेकर

बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी‌’ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत. जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेवर मात करत, त्या त्या क्षेत्रातलं पुरुषी वर्चस्व झुगारून देत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम या महिलांनी सुस्थापित केले. कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थानं त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी‌’ ठरल्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तिघींचा हा परिचय. १. कादंबिनी बोस-गांगुली वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला (१८ जुलै १८६१ – ३ ऑक्टोबर १९२३)…

पुढे वाचा

स्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना – शिरीष चिटणीस

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!”

पुढे वाचा

शरीर एक जादूगार – राजेंद्र देशपांडे, पुणे

वरील शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल पण ते खरं आहे. माणूस व त्याचं शरीर खरंच जादूगार आहे. फक्त माणसाचं शरीरच नाही, सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांची रचना, स्वत: जिवंत राहण्याची त्यांची किमया हे सर्वच विलक्षण आहे. पृथ्वीवरील सर्व जीव याच जादूने जिवंत आहेत. आता ही जादू कोणती? तर सर्वात मोठी जादू निसर्ग करीत आहे ती म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करणं! माणसाच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर, माणसाचा जन्म व्हायच्या आधी, दोन जिवापासून जिवाची निर्मिती, 9 महिने त्याचे उदरात संगोपण, प्रत्येक अवयव जागच्या जागी तयार होणं, मातेच्या उदरात काय आहे,…

पुढे वाचा

मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान – माधवी देवळाणकर

कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

पुढे वाचा

मराठी जीवनभाषा व्हावी

मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक्ती केली जाते. सारे करूनही मराठी ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. केवळ उत्साही असेच कार्यक्रमाचे…

पुढे वाचा

रामो राजमणिः सदा विजयते.. -श्रीराम ग. पचिंद्रे

भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्‍याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, ‘‘कोण आहेस तू? आणि माझ्याडून काय हवंय तुला?’’ 

पुढे वाचा

कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र 

महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हजारो वर्षे त्यांच्या चरित्राची मोहिनी जनमानसावर कशी राहते, अनेक संत, सत्पुरुष केवळ रामनामाने आपली आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला नेऊन जीवनाची कृतार्थता साधतात. काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवन?

पुढे वाचा

भारतीय संगीताचा इतिहास

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम || अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति || – ऋग्वेद संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद ! ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला ‘नादब्रह्म’ म्हणत, याचे पावित्र्य म्हणूनच निरपवाद आहे. या नादब्रह्माच्या निर्मितीला आपण अजून दुसरी बाजू मानतो, ती म्हणजे भगवान शंकराचे तांडव नृत्य, त्यातून निघालेला…

पुढे वाचा

कडू पण गुणकारी औषध #balkatha – हर्षल कोठावदे

राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे… रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आईच्या आग्रहास्तव आईचे म्हणणे त्याला ऐकावे लागे. याउलट परिस्थिती शामची असते. शामने जसा…

पुढे वाचा

सिद्धी : कथा – सुनील माळी

तो घाईघाईतच रात्री नवाच्या सुमारास आपल्या ऑफिसमधून बाहेर पडला. तसा उशीरच झाला होता पण न जाऊन चालणार नव्हते. त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे रिसेप्शन होते रामकृष्ण गार्डनला. पत्रिकेवर दिलेली वेळ संध्याकाळी सात ते दहा अशी होती पण जेवढ्या लवकर आपण पोहोचू तेवढी जास्त माणसे भेटतील, आता आपण निघालो तर किमान एक तास तरी मिळेल, या अपेक्षेने त्याने गाडीला किक मारली.

पुढे वाचा