सुभावभजन : मन होई प्रसन्न!

हिंदू धर्मात ज्याप्रमाणे ईश्वराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याचप्रमाणे ईश्वरीय अवतार समजले जाणारे संत यांचेही स्थान अपरंपार असे आहे. जो सत्याचे आचरण करतो, जो ज्ञानवंत आहे, तो संत असा एक विचार भक्तांच्या मनी वसलेला असतो. संत रुपात अवतार घेऊन समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिंना गुरू, साधू, तपस्वी, ऋषी, महात्मा, स्वामी, मुनी, योगी, तपस्वीनी, योगिनी इत्यादी नावांनी ओळखल्या जाते. पुरातन काळापासून अशा व्यक्तिंनी केवळ धर्मप्रसाराचे काम केले आहे असे नाही तर वेळोवेळी प्रत्येक बाबतीत समाज शिक्षणाचे, सामाजिक जागृतीचे महत्तम काम केले आहे. हजारो वर्षांपासून जी संत परंपरा चालू आहे, ती…

पुढे वाचा

शोध शिक्षणाचा : प्रस्तावना – डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर

भारतात जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले त्यामध्ये जे. कृष्णमूर्ती यांचे नाव एक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून घ्यावे लागते. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेताना त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील समजून घ्यावे लागते. शिक्षणक्षेत्रात गेली 40-50 वर्षे काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, आमच्यापैकी फार थोड्या लोकांना जे. कृष्णमूर्ती समजले आहेत.

पुढे वाचा

कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- ‘अग्निदिव्य’

एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलाने केलेला संघर्ष म्हणजे हे पुस्तक अशीच प्राथमिक ओळख या पुस्तकाची करून द्यावी लागेल.

पुढे वाचा

समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण

subhavbhajan shantaram maharaj nimhan

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख.

पुढे वाचा

हळवा कोपरा – प्रस्तावना

संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.

पुढे वाचा

कस्तुरीगंध – प्रस्तावना

प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा गंध साहित्यक्षेत्रात सर्वत्र दरवळतोय आणि एक अनोखे चैतन्य निर्माण करतोय. या संग्रहातील कथा वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच साहित्याच्या प्रांतात या कथासंग्रहाच्या रुपाने दमदार भर पडली…

पुढे वाचा

विनोबांची शिक्षणछाया – प्रस्तावना

युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’ हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील? तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!

पुढे वाचा

शिक्षणाविषयी चर्चा घडविणारे पुस्तक..परिवर्तानाची वाट

शिक्षणाविषयी बरंच काही बोलले जाते..शिक्षणाचा पारंपारिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहीलेला आहे. अशावेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते.शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतात.अशावेळी शिक्षणाचा विचार समाजासमोर मांडण्याचा संदीप वाकचौरे यांच्या परिवर्तनाची वाट या पुस्तकातून करण्यात आला आहे.चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणा-या शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचकांना शिक्षणाची नवी दिशा देण्याचेच काम करते आहे.पुस्तकाचे शीर्षक हेच मुळी शिक्षणाची नवी वाट दाखविणारे आहे.

पुढे वाचा

प्राजक्ताचे सडे : पत्ररूप प्रस्तावना – न. म. जोशी

कोकणचे लेखक श्री. जे. डी. पराडकर यांचे प्राजक्ताचे सडे हे सलग सहावे पुस्तक चपराक तर्फे प्रकाशित झाले आहे. अल्पावधीतच साहित्य षटकार ठोकून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा विक्रम केला आहे. या सहाव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना लाभली आहे. कोकणच्या मातीचा गंध सर्वत्र पसरविणारी ही प्रस्तावना खास चपराकच्या वाचकांसाठी. नक्की वाचा. प्रतिक्रिया कळवा आणि हे पुस्तक घरपोच मागविण्यास विसरू नका. त्यासाठी संपर्क – 7057292092  पत्ररूप प्रस्तावना श्री. जे. डी. पराडकर यांस, स. आ. ‘प्राजक्ताचे सडे’ या तुमच्या ललित लेखसंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती…

पुढे वाचा

अग्निदिव्य – एका आईची संघर्षगाथा

माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठवाडी शैली. त्यात त्या इतक्या समरसून बोलत होत्या की आपण एखादा चित्रपट पाहतोय असंच वाटत होतं. अत्यंत चित्रदर्शी शैलीत त्या त्यांच्या…

पुढे वाचा