‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला

‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला

अन्न, वस्त्र, निवारा अशा कोणत्याही मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर हाताला काम असणं गरजेचं असतं. गेल्या दशकातील बदलते ट्रेंड पाहता आय. टी. क्षेत्र झपाट्यानं वाढलं. जगभर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ‘आयटीत जा आणि ऐटीत जगा’ असं पालकांकडून सांगण्यात येऊ लागलं. आयटीतल्या मुलांचा लग्नाच्या बाजारातला भावही वाढला. संगणक क्रांती झाल्यावर आयटीमुळं अनेकांचं जगणं सुधारलं. अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आलं.

पुढे वाचा

ब्रह्मचर्यावर बोलू काही!

ब्रह्मचर्यावरी बोलू काही!

‘एक वेळ हिमालयासारखा महापर्वत स्थानभ्रष्ट होईल, आकाश कोसळेल, अग्नी शीतल होईल, पाण्यासारखे पदार्थ स्वतःचे गुणधर्म, स्वतःची ओळख सोडतील पण हा भीष्म केलेल्या ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेचा कधीही भंग होऊ देणार नाही…’ असे ठाम उद्गार आहेत पितामह भीष्माचार्य यांचे. ज्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि एखादी उपासना करावी त्याप्रमाणे ते स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज एखाद्याने कोणताही प्रण केला, प्रतिज्ञा केली की आपण त्यास भीष्मप्रतिज्ञा म्हणतो.

पुढे वाचा

देणाऱ्याने देत जावे

देणाऱ्याने देत जावे

अनंत काणेकरांचा ‘दोन मेणबत्त्या’ नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं, ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास’

पुढे वाचा

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं!

पुढे वाचा

जयाचे आत्मतोषी मन राहे

जयाचे आत्मतोषी मन राहे

“सर उद्या सुट्टी आहे का?” पिंकी म्हणाली. “हो, उद्या जन्माष्टमीची सुट्टी आहे. शाळा भरणार नाही.” शाळेचा दरवाजा बंद करत मी म्हणालो. “नको ना सर उद्या सुट्टी. या ना तुम्ही. आपण दहीहंडी करू.” धीरज म्हणाला. “अरे, आपल्याकडे साहित्य नाही. तुमच्यासाठी खास ड्रेस नाहीत. कसली दहीहंडी? त्याच्यापेक्षा सुट्टी घेऊया.” असं बोलून मी गाडीकडे निघालो. तेवढ्यात किरण म्हणाला,” तुम्ही फक्त या. आपण करू बरोबर.”

पुढे वाचा

खरं तर हीच वेळ!

खरं तर हीच वेळ!

काळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे.

पुढे वाचा

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ अभ्यासच आहे असे नाही तर ते जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून या महामानवांच्या विचारांचा प्रसार करतात. म्हणूनच त्यांची निवड…

पुढे वाचा

सक्षम भारतीय महिला

सक्षम भारतीय महिला

एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजलेल्या आमच्या सोसायटीमध्ये काही चांगल्या प्रथा आम्ही सुरुवातीपासूनच अमलात आणल्या आहेत. त्यामध्ये श्री दत्त जयंती, श्री गणेशोत्सव, दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा वगैरे सण उत्सव आम्ही सार्वजनिकरित्या साजरे करतो. ज्यायोगे आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो!

पुढे वाचा

धीर धरा रे…

धीर धरा रे...

तुम्ही बसने ऑफिसला निघाला आहात, रस्त्याने नेहमीप्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत आहे. नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे. बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स, बाईक्स, टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या. त्यातच एक ट्रक विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वाहतुकीची कोंडी झाली. कुणालाही थांबायला वेळ नाहीये. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे. या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे. बसमधील प्रवासी अगतिकपणे आजूबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत. कुणीही आपले वाहन मागे घ्यायला तयार नाही. तुम्ही हताश होऊन फक्त बघत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

पुढे वाचा

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती! ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

पुढे वाचा