शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी सार्‍या विश्वासाठी आर्ततेनी भाकलेली प्रार्थना म्हणजे पसायदान! सार्‍या विद्यार्थी समूहांसाठी शिक्षकांकडे मागितलेले असेच मूल्यशिक्षणाचे दान म्हणजे ‘चपराक’ने प्रकाशित केलेल संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे पसायदान.’ या पुस्तकाची मांडणी तीस प्रकरणात केली आहे. शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा व शिक्षकांकडून नेमके कोणते वर्तन अपेक्षित आहे, याचे प्रभावी विवेचन या पुस्तकात आहे. एखादा शिक्षक चुकला तर तो भावी पिढी सार्थतेने घडवू शकणार नाही, हे लेखकाचे विधान महत्त्वाचे आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे एखाद्या शिक्षकाने ज्ञानदानाचे काम चोख बजावायचे ठरवले तरच त्यांच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल. अब्दुल कलामांना त्यांचे प्राथमिकचे शिक्षक जास्त…

पुढे वाचा

चौथं पोट – ह. मो. मराठे

राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदाच झालाय. भारतीय राज्यव्यवस्थेत तर राजकारणाइतके बदनाम दुसरे कुठलेही क्षेत्र नाही. महाराष्ट्रातील विख्यात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी एका व्यंगकथेच्या माध्यमातून समकालीन राजकीय व्यवस्थेवर केलेले भाष्य – विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना…

पुढे वाचा

सामर्थ्यवान माता

सिंधुताई सपकाळ यांनी विसाव्या शतकात अनाथांना आणि बेघरांना आश्रय मिळवून दिला. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. अनाथ मुलांचे प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले.

पुढे वाचा

भीमसेनास्त्र

पौराणिक काळात अशी काही अस्त्रे होती की जेंव्हा कोणावर सोडली जात ती तेव्हांच थांबत ज्यावेळी ज्यांच्यावर सोडली आहेत ते त्या अस्त्राला संपूर्ण शरण जातील. ‘भीमसेनास्त्र’ हे असे अस्त्र आहे की ते वारंवार आपल्यावर यावे म्हणून जगभर लाखो रसिक वर्षानुवर्षे त्यांना शरण जात आहेत. काही नावे फारच समर्पक आहेत. भीमसेन हे त्यातलेच एक नाव.

पुढे वाचा

कर्णेश्वरांचा किरणोत्सव

कोकणातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जे. डी. पराडकर यांच्या ‘साद निसर्गाची’ या पुस्तकाच्या यशानंतर त्यांची ‘कसबा डायरी’ आणि ‘बारा सोनेरी पाने’ ही आणखी दोन महत्त्वपूर्ण पुस्तके ‘चपराक’तर्फे लवकरच प्रकाशित होत आहेत. ‘कसबा डायरी’मधील पराडकरांचा हा एक विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी…

पुढे वाचा

संघर्ष हेच सामर्थ्य – तीन महिन्यात तिसरी आवृत्ती

एखादे आत्मकथन म्हणजे त्या काळाचा, त्या व्यक्तिचा पट असतो. त्यातून आपल्या आयुष्यालाही दिशा मिळते. म्हणूनच जागतिक साहित्यात आत्मकथनांना मोलाचे स्थान आहे.

पुढे वाचा

वापसी

संध्याकाळचे सात वाजले होते. पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी आता अंधार पसरू लागला होता. थंडीचा कडाकाही वाढला होता. यावर्षी नोव्हेंबरमध्येच चांगली थंडी जाणवू लागली होती.

पुढे वाचा

कुविचारांची हजामत करणारा सेना न्हावी

‘आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥’ किंवा ‘जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥’ हे अभंग आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमके कोणी लिहिले असावेत? याविषयी काही कल्पना आहे का?

पुढे वाचा

व्यथिता : व्यथित करणारा संग्रह!

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात.

पुढे वाचा

वाटेवरच्या मशाली

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते.

पुढे वाचा