‘डमी’ उमेदवारांमुळे मिळाला विजय

ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा. त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. मुलानं सांगितलं की, ‘‘मला माझा व्यवसाय करू द्या. राजकारणात मला रस नाही.’’ वडील मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं, ‘‘तू निवडून आलास तर लोकांची…

पुढे वाचा

निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत.

पुढे वाचा

स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी ही लढत आहे. दोघेही युवा नेते आहेत आणि आता लोकसभेसाठी आपले भवितव्य आजमावून पाहत आहेत. यानिमित्त स्थानिक भूमिपुत्र विरूद्ध बाहेरचा असा संघर्ष सुरू असला…

पुढे वाचा

एलियन

आपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना ‘एलियन’ असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना ‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात.

पुढे वाचा

स्वभावाचे उत्तरायण

‘एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला’, ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ ही वाक्ये आजकाल ‘बोलाची कढी बोलाचाच भात’ या वाकप्रचारात मोडत आहेत. असे असताना देखील कामापुरत्या गोडबोल्या माणसांच्या भाऊगर्दीत काही माणसं अशी असतात जी आपल्या स्वभावाच्या साखरेने आयुष्य गोड करून जातात.

पुढे वाचा

नायिका

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: । भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥ श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत! तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. ‘ती’ म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई जिने आई बनून आमच्या शैक्षणिक वर्षांत आम्हांला सांभाळले, ती विलक्षण बाई!! तिची ओळख करुन…

पुढे वाचा

अद्वितीय योध्दा संन्यासी… स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणी त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकात्याच्या हायकोर्टात एक प्रसिद्ध वकील म्हणून कार्यरत होते. ते पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे होते. मात्र नरेंद्रची आई भुवनेश्वरीदेवी या धार्मिक विचाराने वागणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा भगवान शिवजी यांच्या भक्तीमध्ये जात होता. लहानपणापासूनच विवेकानंद खूप हुशार आणि खोडकर होते. ते आपल्या सोबतच्या मुलांबरोबर चेष्टा मस्करी करायचे आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते आपल्या शिक्षकांसोबत देखील चेष्टा करण्यास मागे-पुढे बघत नव्हते. त्यांच्या घरात नियमित…

पुढे वाचा

मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजिकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निध्य लाभलेल्या डोंगरात 2021 च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर, एक मादी) मादी बिबट्याने सोबत घेऊन सुरक्षित नैसर्गिक अधिवास गाठला. या संपूर्ण ‘आँखो देख्या’ घटनाक्रमात वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांना मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीची दुर्मीळ नोंद करता आली. या संवेदनशील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने बघ्यांची अपेक्षित…

पुढे वाचा

कोणता झेंडा घेऊ हाती?

कोणता झेंडा घेऊ हाती?

राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत.

पुढे वाचा

नारायणऽऽ नारायणऽऽऽ

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं… दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्रेमानं वागायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. असा प्रवास सुरू असताना एकेदिवशी लक्ष्मण वैतागला. त्यानं सांगितलं, ‘‘मी मूर्ख आहे म्हणून तुमच्याबरोबर आलो. इथं येऊन मला लाकडं गोळा करावी…

पुढे वाचा