कुविचारांची हजामत करणारा सेना न्हावी

‘आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥’ किंवा ‘जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥’ हे अभंग आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमके कोणी लिहिले असावेत? याविषयी काही कल्पना आहे का?

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व.

पुढे वाचा

महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!

महाराष्ट्राचे विचारदुर्ग 

माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच…

पुढे वाचा

स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

परिपाठ झाला. हजेरी घेत होतो. माझ्या लक्षात आलं की ताई आजही गैरहजर आहे. मी तुझ्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारलं,” काय रे? ताई आज का नाही आली?”

पुढे वाचा

तेवीं जालेनि सुखलेशें

तेवीं जालेनि सुखलेशें

सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली.

पुढे वाचा

तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

लगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, “कोण तुम्ही?’

पुढे वाचा

जे सानुकूळ श्रीगुरु

जे सानुकूळ श्रीगुरु

एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. सोबत पत्नी होती. वर्हाड आलेलं होतं. त्या वर्हाडामध्ये त्या मित्राचे आणि आमचे दोघांचेही शिक्षक लग्नासाठी आले होते. मी त्यांच्या पायावर वाकून नमस्कार केला. तितक्यात मला एका मित्राने हाक मारल्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नि माझी पत्नी आणि सर गप्पा मारत बसले.

पुढे वाचा

जयाचे आत्मतोषी मन राहे

जयाचे आत्मतोषी मन राहे

“सर उद्या सुट्टी आहे का?” पिंकी म्हणाली. “हो, उद्या जन्माष्टमीची सुट्टी आहे. शाळा भरणार नाही.” शाळेचा दरवाजा बंद करत मी म्हणालो. “नको ना सर उद्या सुट्टी. या ना तुम्ही. आपण दहीहंडी करू.” धीरज म्हणाला. “अरे, आपल्याकडे साहित्य नाही. तुमच्यासाठी खास ड्रेस नाहीत. कसली दहीहंडी? त्याच्यापेक्षा सुट्टी घेऊया.” असं बोलून मी गाडीकडे निघालो. तेवढ्यात किरण म्हणाला,” तुम्ही फक्त या. आपण करू बरोबर.”

पुढे वाचा

रामफळ

रामफळ

बदली झाली तसे पुन्हा जुन्या शाळेत म्हणजे शाळेच्या गावाला जायला जमलेच नाही. जाण्याचे कारणही नव्हते. दोन्ही गावे तालुक्याच्या दोन विरूध्द टोकाला. अचानक एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. मूलं मला पाहून लपून बसायची. हळूच डोकावून पाहायची. नजरानजर झाली की खुदकन हसायची. दोष त्यांचा नव्हताच. हे होणारच होतं.जवळपास वर्षाने मी गावात जात होतो. खरं सांगायचं तर मीच थोडासा बुजलो होतो. वास्तविक कितीही जवळच्या नात्यामध्ये संपर्काचा खंड पडला की असं होतंच असतं-.

पुढे वाचा