इतिहास संशोधनातील ‘गजानन’

चंद्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.”

पुढे वाचा

वाचाळवीर हरी नरके

वाचाळवीर हरी नरके

‘हा कसला महात्मा? ही तर फुले नावाची दुर्गंधी’ अशा आशयाची अत्यंत संतापजनक आणि चुकीची मांडणी बाळ गांगलसारख्या कोणी केल्यावर किंवा ‘हले डुले महात्मा फुले’ अशी म्हण कुणी अग्रलेखातून मांडल्यावर त्याचा तीव्र विरोध व्हायलाच हवा. महात्मा फुले हे कोणत्याही एका जातीधर्माचे नाहीत तर ते सर्वांचेच आहेत.

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व.

पुढे वाचा

चारित्र्याचा महान आदर्श

चारित्र्याचा महान आदर्श

आपल्या वर्तमानाला आकार देऊन भविष्याची ऊर्जस्वल स्वप्ने सजवण्यासाठी इतिहासाच्या पानात डोकावून त्यातून योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे. ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय होतं हा इतिहास आहे. इतिहासात झालेल्या चुकांमधून बोध घेणे, त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येक इतिहास घडवू पाहणार्‍याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

पुढे वाचा

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

लोकशाहीमध्ये लोकांचा राजकीय तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जनसहभागाचा अर्थ आणि स्वरूप जनतेचा प्रशासकीय सहभाग म्हणजे प्रशासकीय प्रक्रियांवर लोकांचे नियंत्रण होय. हा सहभाग दोन प्रकारे अभ्यासता येऊ शकतो. एक म्हणजे जनतेचा सामान्य प्रशासनातील सहभाग आणि दुसरा म्हणजे जनतेचा विकास प्रशासनातील सहभाग. सामान्य प्रशासनातील जनतेचा सहभाग पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते.

पुढे वाचा

बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो. आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही.

पुढे वाचा

सोच बदलो…तुम बदलोगे

सोच बदलो...तुम बदलोगे।

‘‘विचार सतत वाहतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला पण सत्ता चालली ती विचारांचीच! मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही,’’ हे अनमोल चिंतन आहे… आचार्य विनोबा भावे यांचं! चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. मात्र सकारात्मक विचार करणार्‍या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तिंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगाना सामोरं जावं लागतं! साधारणतः बर्‍याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्ष नसतंच. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात…

पुढे वाचा

समाज अध:पतनाला जातोय…

समाज अध:पतनाला जातोय...

अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जातक कथा लिहिल्या कारण समाज अध:पतनाला जात होता. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी माणसाच्या खलप्रवृत्तीचं वाकडेपण नष्ट करण्यासाठी विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलं कारण समाज अध:पतनाला जात होता. तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला त्यात मुर्खांची लक्षणं सांगितली. तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता. दीडशे वर्षांपूर्वी लोकहितवादींनी लोकपत्र लिहिली, निबंध लिहिली गेली तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता आणि आज एकविसाव्या शतकात समाजातील प्रत्येक घटक सांगू पाहतोय की समाज अध:पतनाला जातोय!

पुढे वाचा

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.

पुढे वाचा

आठवणीतील चित्रपटगृहे

आठवणीतील चित्रपटगृहे

साधारणतः १९५१ ते १९७० ही जी २० वर्षे होती तो काळ भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ओळखला जातो. खरोखरच त्या काळात एकापेक्षा एक सरस नितांत सुंदर अशा चित्रपटांची रेलचेल होती. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याने तसेच अभिनेत्रीने आपल्या अंगभूत अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपट संगीताने त्या काळात सुवर्णकळसच गाठला होता. श्रवणीय तसेच अनवट चालीची गाणी देऊन संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काही चित्रपटांत आठ ते दहा गाणी असूनही सगळीच गाणी श्रवणीय असायची. अभिरुचीसंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार असल्यामुळे त्यांची गाणी म्हणजे बंदा रूपया असायचा. संगीतकार आपल्या जादुई पोतडीतून एकापेक्षा एक वरचढ…

पुढे वाचा