अन्न, वस्त्र, निवारा अशा कोणत्याही मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर हाताला काम असणं गरजेचं असतं. गेल्या दशकातील बदलते ट्रेंड पाहता आय. टी. क्षेत्र झपाट्यानं वाढलं. जगभर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ‘आयटीत जा आणि ऐटीत जगा’ असं पालकांकडून सांगण्यात येऊ लागलं. आयटीतल्या मुलांचा लग्नाच्या बाजारातला भावही वाढला. संगणक क्रांती झाल्यावर आयटीमुळं अनेकांचं जगणं सुधारलं. अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आलं.
पुढे वाचाTag: renuka vyas
पुलवामा -विनम्र अभिवादन
14 फेब्रुवारी. साधारण दुपारची वेळ. सी. आर. पी. एफ.च्या ताफ्यावर एक अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असा आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात भारतीय सैन्याचे 44 जवान शहीद झाले. बातमी सोशल मीडियावर वार्याच्या वेगाने पसरली. दृश्ये तर काळजाचा थरकाप उडवणारी होती. मन सुन्न करणारी घटना! देश सूडाच्या भावनेने पेटून उठलाय, सर्वांना उत्तर हवंय. सूड घ्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करा अशा संतप्त प्रतिक्रियांनी जोर धरलाय. पण त्याने प्रश्न खरेच सुटतील का? आम्ही आज सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना पुन्हा एकदा कंठस्नान घालू, उद्या पुन्हा नवीन संघटना, नवीन संघ तयार होतील आणि पुन्हा नवीन…
पुढे वाचा