आईचं पत्र हरवलं!

आईचं पत्र हरवलं!

माझ्या आईचं पत्र हरवलं! ——————————— ‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. टी व्ही आणि मोबाईल नसलेल्या त्या काळात मैदानी खेळांना प्राधान्य असायचं. क्वचितच आम्ही मुलं घरात असायचो! आंधळी कोशिंबीर, ऊन सावली, डोंगर का पाणी, डबा ऐसपैस, हुतुतू, आट्यापाट्या, गोट्या, भोवरा, लपाछपी, विषामृत, विटी दांडू असे इतर खेळही त्यावेळी आम्ही खेळत होतो. कदाचित आजच्या मुलांना यातील काही खेळांची नावं, ऐकून देखील माहिती नसतील. पण तुमच्या आई-बाबांना, आजी -आजोबांना विचाराल तर ते भरभरून बोलतील या खेळांवर आणि जुन्या काळातील आठवणीत रमूनही जातील! या खेळांना…

पुढे वाचा

आईचं पत्र हरवलं…

आईचं पत्र हरवलं...

चपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्‍या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्‍याच जणांनी ती पाठही केली होती!

पुढे वाचा

समंजस

समंजस

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला.…

पुढे वाचा

पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.

पुढे वाचा

दिवाळी साजरी करायची पण…!

दिवाळी साजरी करायची पण...!

भारतभूमीत प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी ही कशी साजरी करावी ह्या बद्दल मतभिन्नता आहे. प्रत्येकाच्या बालपणी दिवाळी साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद होता. दिवाळी भिन्न प्रकारे साजरी केली जायची हे सांगावे लागण्याची गरज नाही. काळ बदला की सगळं बदलत जाते. प्रत्येक दिवस एक सारखा नसतो.

पुढे वाचा

स्वावलंबन आणि शिस्त

स्वावलंबन आणि शिस्त

आपल्याला मिळालेलं हे सुंदर जीवन जगण्यासाठी स्वावलंबन आणि शिस्त जणू ‘प्राण’च आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात स्वावलंबन नसेल तर आळसामुळे आपलं जगणं निरस झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्या वागण्यात शिस्त नसेल तर या सुंदर जीवनाचा आपण पुरेपूर आनंद उपभोगू शकणार नाही! त्यामुळे स्वावलंबन आणि शिस्तीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. 

पुढे वाचा

स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

परिपाठ झाला. हजेरी घेत होतो. माझ्या लक्षात आलं की ताई आजही गैरहजर आहे. मी तुझ्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारलं,” काय रे? ताई आज का नाही आली?”

पुढे वाचा

जागतिक शांतता आणि भारत

जागतिक शांतता आणि भारत

अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे, ‘भारत-चीन सीमेवर गोळीबार’ नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत – चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा

‘शस्त्र’ वापरावं जपून!

'शस्त्र' वापरावं जपून!

“शब्द संभलकर बोलिए, शब्द को हाथ ना पांव। एक शब्द करे भलाई , तो दुजा करे घाव ॥” क्रांतिकारक संत कबीर महाराजांच्या वरील वचनाप्रमाणे शब्द हे किती मोठं प्रभावी ‘शस्त्र’ आहे हे आपण सगळेच अनुभवत असतो. शब्दानं शब्द वाढत गेला की त्याचं पर्यावसान भांडणात होणं हे ठरलेलंच असतं! तसंच सहानुभूती दर्शविणारे आपुलकीचे चार शब्द देखील एखाद्या वाट चुकलेल्या ‘मुसाफिराला’ दिशादर्शक ठरू शकतात!

पुढे वाचा

तेवीं जालेनि सुखलेशें

तेवीं जालेनि सुखलेशें

सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली.

पुढे वाचा