ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.
पुढे वाचाTag: Chaprak
आठवणीतील चित्रपटगृहे
साधारणतः १९५१ ते १९७० ही जी २० वर्षे होती तो काळ भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ओळखला जातो. खरोखरच त्या काळात एकापेक्षा एक सरस नितांत सुंदर अशा चित्रपटांची रेलचेल होती. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याने तसेच अभिनेत्रीने आपल्या अंगभूत अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपट संगीताने त्या काळात सुवर्णकळसच गाठला होता. श्रवणीय तसेच अनवट चालीची गाणी देऊन संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काही चित्रपटांत आठ ते दहा गाणी असूनही सगळीच गाणी श्रवणीय असायची. अभिरुचीसंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार असल्यामुळे त्यांची गाणी म्हणजे बंदा रूपया असायचा. संगीतकार आपल्या जादुई पोतडीतून एकापेक्षा एक वरचढ…
पुढे वाचाइन्सान ढुंढने मै चला…
माणूस हा जगाच्या पाठीवर एकच असा प्राणी आहे, ज्याला वाटतं आपण सगळं काही करु शकतो. आपण अख्ख्या जगावर नियंत्रण ठेवू शकतो, एवढा तो महत्त्वाकांक्षी होत चालला आहे. बटन दाबताच त्याला सर्व कसं समोर हजर पाहिजे असतं. सगळ्या यंत्रणांंचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असावं अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वांनी आपलंच ऐकून घ्यावं, असा त्याचा सतत आग्रह असतो!
पुढे वाचाझुंडशाहीचं करायचं काय…?
सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्यासाठी उपद्रव्यमूल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय.
पुढे वाचाआठवणींचा सुगंध
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्या आठवणी मनातील या कोपर्यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
पुढे वाचाभ्रमिष्टपणा की एजंटगिरी?
‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं…
पुढे वाचानिर्वाण
कथाकार गदिमांचा इतका सुंदर परिचय दिनकर जोशी यांनी करून दिल्यानंतर खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी गदिमांची एक कथा पुनर्प्रकाशित करीत आहोत. मूळ कथा असल्याने यातील भाषा आणि व्याकरण अर्थातच त्यांच्या त्यावेळच्या कथेतल्याप्रमाणे आहे. आजच्या कट्टरतावादाच्या काळात ही कथा वाचकांना एक वेगळा विचार देऊन जाईल. – संपादक
पुढे वाचाफ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक
रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.
पुढे वाचाटाळता येण्यासारखं बरंच काही…
प्रसंग पहिला… नेहमीचाच वर्दळीचा चौक. “अहो काका, मी कधीचा हाॅर्न वाजवतोय… तुम्हाला थोडी साईड देता येत नाही का? मला डावीकडे वळायचं आहे!”
पुढे वाचाआसक्ती
आपण सगळे जाणतो की महाभारतात युधिष्ठिराने द्यूत नावाचा खेळ (जुगार) खेळताना द्रौपदीला पणाला लावलं होतं. दुर्योधनाने शकुनीच्या मदतीने द्रौपदी ला जिंकलं होतं. द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली होती. युधिष्ठिर पहिल्यांदा स्वतः जवळचं धन द्यूतात पणाला लावून हरला. नंतर स्वतःचं राज्य त्यानं द्यूतात पणाला लावलं, ते ही तो हरला. त्या नंतर त्यानं स्वतःला पणाला लावलं आणि तो स्वतः दुर्योधनाचा दास झाला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या भावांना पणाला लावलं. त्यांनाही तो द्यूतात हरला. त्याचे भाऊ दुर्योधनाचे दास झाले आणि सरतेशेवटी तो हरलेलं सगळं परत मिळवण्यासाठी द्रौपदीला पणाला लावून द्यूतात हरला आणि द्रौपदीही दुर्योधनाची दासी…
पुढे वाचा