‘जय जय रघुवीर समर्थ’!! ‘र्थ’ वर जोर देऊन त्याने पूजेची सांगता केली. पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आसनाची घडी करून शेल्फमध्ये ठेवली आणि कपडे बदलायला आतल्या खोलीत ‘झाली बाबा एकदाची देवपूजा’ असे पुटपुटत गेला. दोन्ही मुलं अजून सोफ्यावर लोळत पडलेली. दोघांना यथेच्छ शिवीगाळ करून झाल्यावर त्याचा मोर्चा पत्नीकडे वळला. तिथे अजून अर्धवट तयारी झालेली दिसल्यावर उरलेली शिवीगाळ तिथे झाली. मुलांनी त्रासिक चेहर्याने ऐकून घेतले होते पण पत्नीने प्रतिवार केले आणि मघाशी चकाचक केलेल्या देवमूर्तीपुढे छानशी शाब्दिक चकमक उडाली. हे सारे नित्य असते. घरातल्या सदस्यांनाच काय देवालाही ह्याची सवय झाली असणार. देवासमोर गंभीर…
पुढे वाचाTag: marathi literature
ज्याला आय नाय त्याला काय नाय | आई – द. गो. शिर्के
ज्यांना आई नाही असे ज्येष्ठ लोक आई असलेल्या त्यांच्या स्नेह्यासोबत्याकडे पाहून नेहमी हळहळतात. आपलं यश बघायला आई हवी होती, अपयशाच्यावेळी विश्वासाने डोकं टेकवायला आई हवी होती, आपल्या आजाराच्या यातनापर्वात दिलासा द्यायला आई हवी होती असं बहुतेक सर्वांना वाटतं. माणसाचं वय, पद, कितीही वाढलं तरी ती ओझी झुगारून द्यायला प्रत्येकाला एक जागा हवी असते. ती फक्त आईच देऊ शकते.
पुढे वाचासतत जळणारा आणि फुलणारा लोककवी
उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत.
पुढे वाचामातृभाषा ज्ञानभाषा व्हावी
मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत…
पुढे वाचानायिका
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: । भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥ श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत! तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. ‘ती’ म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई जिने आई बनून आमच्या शैक्षणिक वर्षांत आम्हांला सांभाळले, ती विलक्षण बाई!! तिची ओळख करुन…
पुढे वाचा