रिलेशनशिप

रिलेशशिप

हातात डोकं गच्च धरून, जोर जोरात आदिती ओरडत होती. ‘‘जा इथून सगळे जण… कोणी नकोय मला… मला एकटं राहू द्या…. मला थोडी तरी शांतता हवीय… जाऽऽऽ… प्लिज… जाऽऽ… हात जोडते… पाया पडते…’’ पण तिचा आक्रोश कोणी ऐकायलाही तयार नव्हतं. आई, बाबा, ताई, मैत्रिणी सगळेजण तिच्या भोवती गोळा होऊन तिला विचारत होते, ‘‘काय केलंस तू हे? डॉक्टर ना तू? का? कशासाठी?’’ आणि आदितीकडे कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. खरंतर उत्तरं देता येऊ नयेत कोणाला असे प्रश्न तरी आयुष्यात का निर्माण व्हावेत?

पुढे वाचा

समाज अध:पतनाला जातोय…

समाज अध:पतनाला जातोय...

अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जातक कथा लिहिल्या कारण समाज अध:पतनाला जात होता. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी माणसाच्या खलप्रवृत्तीचं वाकडेपण नष्ट करण्यासाठी विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलं कारण समाज अध:पतनाला जात होता. तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला त्यात मुर्खांची लक्षणं सांगितली. तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता. दीडशे वर्षांपूर्वी लोकहितवादींनी लोकपत्र लिहिली, निबंध लिहिली गेली तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता आणि आज एकविसाव्या शतकात समाजातील प्रत्येक घटक सांगू पाहतोय की समाज अध:पतनाला जातोय!

पुढे वाचा