चीनची सफर

चीनची सफर

2009 च्या ऑक्टोबरमध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता. चिंदाव ह्या उत्तर चायनामधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापीठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता.

पुढे वाचा

सावळबाधा

सावळबाधा

तुला शब्दांत उतरवणं खरंच सोपं नाहीये. तुझ्या अदा, मुड्स, नजाकती, यामुळेच खूप मुलखावेगळा भासतोस! …म्हणून कदाचित तू मनापासून भावतोस.

पुढे वाचा

समर्पण

समर्पण

एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, ‘‘महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?’’ ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, ‘‘अगं आतून जरा कंदील घेऊन ये.’’

पुढे वाचा

संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी प्रासादिक कादंबरी

घास घेई पांडुरंगा

रवीन्द्र भट यांची संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी ‘घास घेई पांडुरंगा’ ही रसाळ व प्रासादिक शैलीतील सात्विक आनंद देणारी कादंबरी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली. रवीन्द्र भट संस्कार शिबिराच्या निमित्ताने पंढरपूरात असताना संत नामदेव समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते श्री प्र. द. निकते शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेवांच्या चरित्रावर आधारित कादंबरी लिहावी अशी विनंती करतात.

पुढे वाचा

लाखाची गोष्ट

लाखाची गोष्ट

मथळा वाचल्यानंतर याला लाखाची लॉटरी लागली की काय? असा प्रश्‍न वाचकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याने लाखाचे बारा हजार तर केले नाहीत ना, अशी शंका येण्याची शक्यता आहे पण त्या लाखाची ही गोष्ट नव्हे. मराठी मनाच्या बदललेल्या मानसिकतेची ही गोष्ट आहे.

पुढे वाचा

निजात्मप्राप्ती साधावी!

निजात्मप्राप्ती साधावी!

बालपणापासूनच माझ्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. त्यातून मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळत असे. रोज कानी पडणार्‍या त्या सात्त्विक शब्दांमुळे वाणी शुद्ध होत असे. ही पद्धत वर्षानुवर्षे आमच्या घरात चालू होती.

पुढे वाचा

सद्गुरू… सौख्याचा सागरू!

सद्गुरू... सौख्याचा सागरू!

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं… आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं!

पुढे वाचा

यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते.

पुढे वाचा

पतंगे गुरूजी

पतंगे गुरूजी

माणसाच्या आयुष्यात शालेय जिवनातील संस्काराचे महत्त्व असतेच. माझे बहुतांश आयुष्य ग्रामीण भागात गेले. जुन्या निलंगा आणि नवीन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ हे आमचे गांव.

पुढे वाचा

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर!

पुढे वाचा