इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते.
पुढे वाचाTag: saptahik chaprak
पतंगे गुरूजी
माणसाच्या आयुष्यात शालेय जिवनातील संस्काराचे महत्त्व असतेच. माझे बहुतांश आयुष्य ग्रामीण भागात गेले. जुन्या निलंगा आणि नवीन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ हे आमचे गांव.
पुढे वाचागुरुत्वाकर्षण
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर!
पुढे वाचामहामेरू
श्रीगुरूचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदू श्रीचरण। श्रीगुरूंचे ॥
पुढे वाचाकोटीच्या कोटी उड्डाणे…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षापासून वृक्ष लागवड मोहिमेवर आणि पाणी प्रश्नांवर विशेष लक्ष दिल्याचे पहायला मिळते. वृक्ष लागवडीसाठी तेहतीस कोटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कोणतीही योजना चांगली असते, आकर्षक असते, त्याची चर्चा होते; परंतु यंत्रणा त्याची कार्यवाही कशाप्रकारे करते यावरच त्याचे यशापयश अवलंबून असते. आजअखेर वृक्षारोपण आणि त्या अनुषंगाने होणारे कार्यक्रम टीकेचे विषय झालेले आहेत.
पुढे वाचाआपण काही करू शकतो?
Anyone who doesn’t take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either. – Albert Einstein बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ्यावर फिदायीन म्हणजे आत्मघाती जिहादीने स्फोटकाने भरलेली गाडी आदळून 40 जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता उठलो, तेव्हा चहा घेताना हाती दैनिक ‘लोकसता’ होता. पुलवाम्यात घडलेल्या भयंकर घटनेची बातमी वाचली आणि सकाळचे विधी उरकले. अंधोळ नाश्ता झाल्यावर त्या…
पुढे वाचाजयघोष निनादला…!!
सावरकर जयंतीच्या निमित्ताने ठाणे येथील जागतिक आणि सामाजिक मंच व ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील मराठी असोसिएशन ऑफ सिडनी इन्कॉर्पोरेटेड (मासी) या दोन संस्थांनी संयुक्तपणे सावरकर विश्वसंमेलनाचे आयोजन केले होते. हे चौथे संमेलन होते. आजवरची तीनही संमेलने उत्तमरित्या आणि निर्वेध पार पडली. यावेळचे संमेलन मात्र अपवाद ठरले. अगदी निघायच्या दिवसापर्यंत विसाचा पत्ताच नव्हता.
पुढे वाचा‘श्यामची आई’ साठी बेचाळीस वर्षे महाराष्ट्र भ्रमण
कुठेही नोकरी न करता समाजसेवेच्या भावनेतून शाळा देतील ते मानधन स्वीकारून साने गुरुजींचे वाङमय प्रसार करणारा एक कलाकार गेल्या बेचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र भ्रमंती करत आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ समाजाच्या तळागाळातील असंख्य मुलांपर्यंत पोहोचविणारा हा कलाकार इतके दिवस प्रसिद्धीपासून दुर्लक्षित कसा राहिला याचेच आश्चर्य आहे .
पुढे वाचा‘पर्यटन स्थळ’ असलेली एकमेव स्मशानभूमी
काही दिवसापूर्वी वाराणसी अर्थात श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचा योग आला. काशी हे हिंदुंचे पवित्र धर्मस्थळ आहे. असे म्हणतात की आयुष्यात एकदा का होईना काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि गंगेत डुबकी मारावी. जगभरातून अनेक हिंदू लोक येथे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येतात. अभ्यास आणि पर्यटनाचा भाग म्हणून देखील अनेक विदेशी पर्यटक काशीला आवर्जून भेट देतात. काशीला जर भेट दिली तर काही गोष्टी आवर्जून बघाव्यात आणि त्या म्हणजे काशी विश्वेश्वराचे दर्शन, बनारसी साडी, गंगेची आरती, गंगेच्या काठी बांधलेले प्रसिद्ध घाट.
पुढे वाचा