लोकोत्सव व्हावा विधायकसेना – देवदत्त बेळगावकर

वेदांपासून ते अगदी आजच्या काळापर्यंत पूजला जाणारा देव म्हणजे गणपती होय. ऋग्वेदातील एक ऋचा आहे त्याला गणपती सुक्त असे म्हणतात. पुराण काळात तर गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. आज गणपती केवळ देवळात पुजला जातो असे नाही तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात बसवलेल्या मूर्तीलाही मंदिरातल्या गणपतीइतकेच महत्त्व दिले जाते. भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला जितके महत्त्व आहे तसेच महत्त्व आता माघ महिन्यात गणेश जन्माच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवालाही येऊ लागले आहे. गणरायाचा हा उत्सव आता दिवाळीपेक्षा देखील मोठा होईल का काय? असे रूप या उत्सवास प्राप्त झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर…

पुढे वाचा

माझा गणेश – जयेंद्र साळगांवकर

माझा जन्मच मालवणचा! माझे वडील स्व. जयंतराव साळगांवकर हे लहानाचे मोठे मालवणमध्येच झाले. पुढे ते नोकरीकरिता मुंबईला आले आणि येथेच स्थायिकही झाले. तरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सर्व कुटुंबीय मालवणला जाऊन घरी गणेशाची मूर्ती आणून, तिची यथासांग पूजा करून आणि पाचव्या दिवशी विसर्जन करूनच मुंबईला परतत असू. अनेक वर्षे हे सुरू होते. मुंबईला जेव्हा त्यांनी एक इमारत विकत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या आई म्हणजे आमच्या आजी स्व. इंदिराबाई साळगांवकर यांच्याशी विचारविनिमय करून गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. तीच प्रथा अजूनही आमच्या कुटुंबात सुरू असून आमच्या समस्त साळगांवकर कुटुंबाचा तो एकच…

पुढे वाचा

या वर्षी गणेशोत्सव 11 दिवसांचा – मोहनराव दाते – पंचागकर्ते

दिनांक 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते. भारतात आणि विशेषत्वाने…

पुढे वाचा

‘चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव – घनश्याम पाटील

सस्नेह जय गणेश! आळंदी-पंढरपूरची भक्तिमय वातावरणात अविरतपणे सुरु असलेली वारी, गणेशोत्सव आणि दिवाळी अंक या तीन परंपरा मराठी माणसाच्या अस्मितेच्या, गौरवाच्या आहेत. ‘चपराक’ मासिकाने वारीच्या निमित्ताने सातत्याने दर्जेदार साहित्य दिलेले आहेच. दिवाळी अंकाच्या परंपरेत तर ‘चपराक’चा अंक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षीपासून दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पांचा विशेषांक प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. खरेतर गणपती म्हणजे विद्येची देवता! प्रत्येक कामाची मंगलमय सुरुवात म्हणजे श्रीगणेशा!! ‘त्याच्या’ कृपेने प्रत्येक कार्य तडीस जाते, अशी आपली दृढ श्रद्धा. अनेकांनी ती अनुभूती आपापल्या पातळीवर घेतलेली असते. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळकांनी हा…

पुढे वाचा