अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत.

पुढे वाचा

व. पु. काळे – माझे दोस्त!

ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्‍यावर बसून आम्ही  यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’  ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’  मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून झर्रझर्र ओळी कागदावर उमटत होत्या. का माहीत नाही, पण त्यावेळी हा लेख लिहून झाल्यावर मी खूप…

पुढे वाचा

साहेब निर्मितीचे कारखाने

छोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही! नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद! झिंदाबाद!’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक करणार्‍या गुलामीच्या भक्तिभावाने नवे नवे आपले साहेब निर्माण करत असतो.  घराबाहेर पडलो, भल्या सकाळीच. जरा बर्‍या हवेत फिरायला म्हणून! पण काल रात्री जे नव्हतं ते अचानक घराबाहेरच्या चौकात प्रकटलं होतं. ते होतं महाप्रचंड पोस्टर. अगदी नुकतंच मिसरूड गर्द होत चाललेल्या तरूणाचा चेहरा…

पुढे वाचा

अंतर्मुखता हे सामर्थ्य

त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…

पुढे वाचा