मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

पुढे वाचा

साहेब निर्मितीचे कारखाने

छोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही! नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद! झिंदाबाद!’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक करणार्‍या गुलामीच्या भक्तिभावाने नवे नवे आपले साहेब निर्माण करत असतो.  घराबाहेर पडलो, भल्या सकाळीच. जरा बर्‍या हवेत फिरायला म्हणून! पण काल रात्री जे नव्हतं ते अचानक घराबाहेरच्या चौकात प्रकटलं होतं. ते होतं महाप्रचंड पोस्टर. अगदी नुकतंच मिसरूड गर्द होत चाललेल्या तरूणाचा चेहरा…

पुढे वाचा

अंतर्मुखता हे सामर्थ्य

त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…

पुढे वाचा