वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019 भारतीय भक्ती संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणार्‍या वारकरी संप्रदायास संत ज्ञानोबा माऊली व संत नामदेवरायांनी लोकप्रियता मिळवून दिली. संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात असला तरी त्यांनी आपल्या ग्रंथातून व कार्यातून वारकरी संप्रदायास मूर्त रूप दिले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. सामाजिक समतेचा व वारकरी संप्रदायाच्या भक्तिमंदिराचा पाया घालणार्‍या संत ज्ञानेश्वरांचे अभंग, ओवी, गवळण, विरहिणी, भारूड यामधून त्यांचे विश्वात्मक अंतःकरण प्रतीत होते.

पुढे वाचा

पायी वारीचा इतिहास

पायी वारीचा इतिहास

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्‍यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.

पुढे वाचा

माध्यमांतराचा रंजक धांडोळा

माध्यमांतराचा रंजक धांडोळा

आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्याच्या मनातील सुप्त भावनांना अंकुर फोडणं आणि काहीवेळा त्याला खतपाणी घालणं हे सर्वकाही एखाद्या अव्वल साहित्यकृतीतून घडू शकतं. असं साहित्यच काळाच्या ओघात…

पुढे वाचा