माध्यमांतराचा रंजक धांडोळा

माध्यमांतराचा रंजक धांडोळा

आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्याच्या मनातील सुप्त भावनांना अंकुर फोडणं आणि काहीवेळा त्याला खतपाणी घालणं हे सर्वकाही एखाद्या अव्वल साहित्यकृतीतून घडू शकतं. असं साहित्यच काळाच्या ओघात…

पुढे वाचा