‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’

प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता.…

पुढे वाचा

पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!

पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!

फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपूर्ण बुद्धीनिष्ठेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देऊ शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजणारे हे शतमूर्ख ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळूनही विद्वत-अडाणी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हणजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातून हे लोक बाहेर कधी येतील ते येओत. वाद या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमध्येच होऊ शकतो. ज्यांना मुळात विचार कशाशी खातात याचेच ज्ञान नाही…

पुढे वाचा