भाषणांची पन्नास वर्षे!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…

पुढे वाचा

मराठीतील पहिलं वाक्य

मराठीतील पहिलं वाक्य

जैसी दीपामाजी दिवटी का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी तैसी भाषामध्ये मर्‍हाटी सर्वोत्तम! संत ज्ञानेश्‍वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला.

पुढे वाचा

या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

‘‘आयुष्यात दु:ख येतं ते वळवाच्या पावसासारखं पण सुख मिळतं ते गुलाब पाण्यासारखं’’, ‘‘माणसाला सुखाचं संबंध वर्ष जेवढं शहाणपण शिकवत नाहीत तेव्हढं संकटाचा एक क्षण शिकवून जातं.’’, ‘‘माणसाची इच्छा ही नंदनवनातील कल्पकता नाही तर ती वाळवंटातील हिरवळ आहे’’ ही वाक्यं म्हणजे ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्यसागरातील मोती होत. सुविचारांची रत्ने होत.

पुढे वाचा