सावरकरांची कविता: आत्मबल -सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या लेखनातून व आजवर वाचलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक लेखातून, पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची प्रखर देशभक्ती, ओजस्वी बुद्धिमत्ता, त्यांची काव्यप्रतिभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ‘आत्मबल’ होय. या आत्मबलाच्या जोरावरच तर ते मार्सेलिसच्या समुद्रात जहाजाच्या हातभर रुंद खिडकीतून 20 फूट उंचावरून अथांग समुद्रात उडी टाकू शकले होते व याच आत्मबलाच्या जोरावर अंदमानासारख्या ठिकाणी एका अंधार्‍या कोठडीत, अनन्वित शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करू शकले होते. ‘आत्मबल’ या त्यांच्याच कवितेत त्यांनी मृत्युला केलेले एक भीषण आव्हान आहे व तेही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या वृत्तीमुळे.काय असेल त्या वेळी त्यांची गलबलवणारी…

पुढे वाचा

या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

‘‘आयुष्यात दु:ख येतं ते वळवाच्या पावसासारखं पण सुख मिळतं ते गुलाब पाण्यासारखं’’, ‘‘माणसाला सुखाचं संबंध वर्ष जेवढं शहाणपण शिकवत नाहीत तेव्हढं संकटाचा एक क्षण शिकवून जातं.’’, ‘‘माणसाची इच्छा ही नंदनवनातील कल्पकता नाही तर ती वाळवंटातील हिरवळ आहे’’ ही वाक्यं म्हणजे ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्यसागरातील मोती होत. सुविचारांची रत्ने होत.

पुढे वाचा