कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र 

महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हजारो वर्षे त्यांच्या चरित्राची मोहिनी जनमानसावर कशी राहते, अनेक संत, सत्पुरुष केवळ रामनामाने आपली आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला नेऊन जीवनाची कृतार्थता साधतात. काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवन?

पुढे वाचा

नारायणऽऽ नारायणऽऽऽ

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं… दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्रेमानं वागायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. असा प्रवास सुरू असताना एकेदिवशी लक्ष्मण वैतागला. त्यानं सांगितलं, ‘‘मी मूर्ख आहे म्हणून तुमच्याबरोबर आलो. इथं येऊन मला लाकडं गोळा करावी…

पुढे वाचा