सदोबांचं बेगडी इतिहासप्रेम

महाराष्ट्रात विचारवंतांची कमतरता नाही. त्यातही पुणे शहरात तर नाहीच नाही. इथे एक विचारवंत शोधा; तुम्हाला दहा मिळतील. अशाच ‘विचारवंतांपैकी’ एक आहेत डॉ. सदानंद मोरे. ते घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. तत्त्वज्ञानात रमतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते देहूकर मोरे आहेत आणि थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख‘ असे रामदास स्वामींनी म्हटले असले तरी सध्या कोण कुणाचा वारसदार आहे हे सांगावे लागते. कुणी कुणाच्या संपत्तीचा वारसदार असते; तर कुणी विचारांचा! सदानंद मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे म्हणायला…

पुढे वाचा

संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा म्हणजे औचित्यभंग-सदानंद मोरे

पुणे, (चपराक प्रतिनिधी) ः पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ‘तो पुतळा संभाजी उद्यानात परत बसवू’ हा भाजपचा निवडणुकीतील प्रचारातला प्रमुख मुद्दा होता. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाला या मुद्याचा सोयीस्कर विसर पडलेला असतानाच ‘संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणे हा औचित्यभंग आहे.

पुढे वाचा