आईच्या म्हणी : एक समृद्ध दालन- डॉ. शकुंतला काळे

भाषेचे सैांदर्य अनेक अंगांनी बहरतं, समृद्ध होतं ते त्यातील शब्दप्रयोग, म्हणी, वाकप्रचार यांच्या वापराने. त्यात म्हणींचा वापर हा तर भाषिक समृद्धीचा परमबिंदू आहे. म्हणींचा वापर करत वारसा निर्माण करण्याचे काम जुन्या पिढीतील मंडळींनी केले आहे. भावभावनांचा आविष्कार, रूढी, परंपरा, लोकजीवन, त्या-त्या भागातील संस्कृती, मूल्ये, जगण्यातला विरोधाभास, प्रकृृती आणि विकृती या साऱ्याचं प्रतिबिंब म्हणींच्या वापरातून ध्वनीत होतं. म्हणींमध्ये विनासायास जुळलेला यमक भाषेच्या नजाकतीत अजून भर घालतो आणि थोड्याशा शब्दात किती मोठा आशय आढळतो याचा साक्षात्कार म्हणींमूधन प्रत्ययास येतो.

पुढे वाचा