पाऊले चालती पंढरीची वाट

Dehu Alandi Pandharpur Wari 2017 Image

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्‍याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात. आषाढी वारी फार महत्त्वाची मानली…

पुढे वाचा

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…

पुढे वाचा

धोका प्रतिक्रियावाद्यांचा!

मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’

पुढे वाचा

आयुष्यावर बोलतो काही!

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे

पुढे वाचा

विठ्ठलाचे ‘देखणे’

वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात आयुष्याचं मार्गक्रमण असताना वाटेत दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही तुकोबा-माऊलींच्या रूपात पाहणे आणि त्यांच्यातला अंतर्रुपी विठ्ठल शोधणे यात जे आध्यात्मिक, आत्मिक समाधान मिळते, त्याची तुलना जगात कुणासोबतही होऊ शकत नाही. या आनंदातून मिळणारी विठ्ठलाच्या सहवासाची एकरूपता ही जगण्याच्या वास्तवाचं भान मिळवून देते. शेवटी वारी म्हणजे काय तर तुम्हाला मिळालेला सर्वसामान्यांच्या आध्यात्मिकतेचा आत्मिक साक्षात्कारी आनंद… आणि त्यातून विठ्ठलाचं देखणेपण रामरूपी चंद्राच्या शीतलतेतून शोधून, आपल्याला त्याचा परिसस्पर्श घडवणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे…

पुढे वाचा

वाडे चिरेबंदी; रस्ते माणुसकीचे!

पाचशे वर्ष दिमाखाने उभी असणारी किल्ल्याची वास्तू जशी नगरची शान आहे, तशाच अनेक ऐतिहासिक वास्तू देखील शहरात आहेत. नगर शहरात नऊ वेशी होत्या! पैकी माळीवाडा आणि दिल्ली दरवाजा वेस आजही अस्तित्त्व टिकवून आहेत. त्या पाडण्याची मोहीम निघाली होती पण इतिहास संशोधकांनी कोर्टात जाऊन त्या वाचवल्या. त्यावेळी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांची मदत झाल्याचा इतिहास आहे. बागरोजा, दमडी मशीद, चांदबीबी महाल अशा अनेक वास्तू नगरची शान आहेत; तरीही आम्हाला आठवतात ते आमचे दगडी वाडे! आमच्या शाळेच्या इमारती!

पुढे वाचा

महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे.  ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात महिलांच्या विकासाकडे पाहिले की जाणवते की त्यांचा स्त्रीशक्तीचा हा विचार किती दूरदृष्टीचा होता आणि आपल्या देशासाठी…

पुढे वाचा