दि. 7 व 8 जानेवारी 2017 रोजी पहिले ऐतिहासिक आदिवासी धनगर साहित्य संमेलनं सोलापूर येथे पार पडले. या साहित्य संमेलनामुळे नवा इतिहास घडला. धनगर समाजबांधवांना जगण्याची नवी उर्मी मिळाली. शेकडो वर्षांचा त्यांच्या जीवनातील काळोख दूर झाला. धनगरांचा एक नवा साहित्यिक प्रवाह सुरू झाला. सद्या सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सर्व काही अभिमानास्पद आणि सुखद असेच आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.
पुढे वाचाTag: marathi magazine
सुंदर आठवणींचा सुंदर गोफ
खरंतर मी मनात गुंफलेला हा सुंदर आठवणींचा सुंदर गोफ आहे का? हा माझा मलाच पडलेला प्रश्न! जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा! तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता! त्या वाड्यात सगळे भाऊ एकत्र रहायचे… त्याला घोलकर वाडा म्हटलं जायचं. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर…
पुढे वाचाएकाच या जन्मी जणू…
इतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले.
पुढे वाचाअगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू क्षण!
काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात. आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका! ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते. ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही. त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका. मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पहायलाच नको! हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येऊन गेलेले असतात; पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्त्व…
पुढे वाचाअसहिष्णुता चांगली की वाईट?
सध्या प्रसारमाध्यमांद्वारे सर्वात जास्त चर्चिल्या जाणार्या ‘असहिष्णुता’ या शब्दाच्या मुळाशी जाताना आधी हा ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्या ‘सहिष्णुता’ या शब्दाकडे लक्ष द्यायला हवे. मुळात इंग्रजी प्रसारमाध्यमांनी चर्चेत आणलेल्या ‘टॉलरन्स’ या इंग्रजी शब्दाचे हे मराठी भाषांतर आहे. सध्या भारतात असहिष्णुता आहे की नाही, यावर मोठा वाद चालू आहे आणि नजिकच्या भविष्यकाळात हा वाद संपुष्टात येण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. यातही वैशिष्ट्यपूर्ण भाग असा की, दोन्ही बाजूंचे प्रतिद्वंद्वी असहिष्णुता आहे की नाही यावरच मोठ्या हिरीरीने वाद घालत आहेत.
पुढे वाचाबदल्यांचे राजकारण : नोकरशाहीतील माफियांचे वर्चस्व
बदल हा निसर्गाचा नियम आहे. पशु-पक्षी काळ व वातावरणानुसार स्थलांतर करतात. वृक्षांची पानेदेखील गळणे, नवी पालवी येणे, नदीच्या-ओढ्यांच्या पाण्याची पातळी पावसाळ्यात वाढणे किंवा उन्हाळ्यात कमी होणे, तारुण्य जाऊन वार्धक्यात त्वचेला सुरकुत्या येणे, आजारपणात हवाबदल करणे हा त्या बदलांचा एक भाग आहे.
पुढे वाचाकार्ल मार्क्स समजून घेताना…
आजवर या जगावर अनेक विचारवंत, कलाकार, राज्यकर्ते, लेखक इत्यादींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, चांगला किंवा वाईट प्रभाव टाकला. त्यातूनच आजचा समाज घडला. आपल्या समाजाच्या सद्यस्थितीस कारणीभूत असलेले कित्येक विचारवंत आपल्याच नव्हे तर इतिहासाच्या देखील विस्मृतीत गेले आहेत. काही व्यक्ती असतात ज्या या कालपटलावर आपल्या विचारांनी स्वतःच एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यातलाच एक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स!
पुढे वाचापाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात. आषाढी वारी फार महत्त्वाची मानली…
पुढे वाचाकोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ
भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…
पुढे वाचाधोका प्रतिक्रियावाद्यांचा!
मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’
पुढे वाचा