समंजस

समंजस

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला.…

पुढे वाचा

पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.

पुढे वाचा

संपादकीय

संपादकीय

एकदा एक भविष्यवाणी झाली. ‘पुढची पंधरा वर्षे जमिनीत काहीच पिकणार नाही…’ ती ऐकून सगळे शेतकरी हवालदिल झाले. सगळ्यांपुढं मोठं प्रश्नचिन्ह! बरं, पंधरा वर्षे म्हणजे कालावधीही थोडाथोडका नव्हता. या वर्षात पिकलंच नाही तर खायचं काय? सगळेच चिंतेत होते. पंधरा वर्षे पिकणार नाही म्हटल्यावर रोज रानात जाण्याची गरज नव्हती. कामही करावं लागणार नव्हतं. पिकणारच नाही तर कष्ट करून काय फायदा? असा साधा-सोपा विचार होता. अशा सगळ्या वातावरणात गावातला रामू मात्र रोज रानात जायचा. त्यानं नांगरणी सुरू केली. त्याआधी रानातलं सगळं तण बाजूला सारलं. त्याचा हा खुळेपणा पाहून सगळे हसू लागले. एकानं विचारलं,…

पुढे वाचा

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’ -स्वामी रामानंद तीर्थ)

पुढे वाचा

समईच्या शुभ्रकळ्या

समईच्या शुभ्रकळ्या

सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्‍वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

पुढे वाचा

रामची आई!

रामची आई!

राम शेवाळकर यांना त्यांच्या आईची आठवण येताच गहिवरून यायचे. गोपिकाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मात्र तिच्या बाबतीत ते वयाच्या अडीच वर्षापासून दुरावले होते. एखाद्या अपत्यास जन्मत:च एखादा अवयव नसावा आणि त्याला त्या अपंगत्वाची सवय व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आईचे नाते होते.

पुढे वाचा

धीर धरा रे…

धीर धरा रे...

तुम्ही बसने ऑफिसला निघाला आहात, रस्त्याने नेहमीप्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत आहे. नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे. बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स, बाईक्स, टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या. त्यातच एक ट्रक विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वाहतुकीची कोंडी झाली. कुणालाही थांबायला वेळ नाहीये. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे. या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे. बसमधील प्रवासी अगतिकपणे आजूबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत. कुणीही आपले वाहन मागे घ्यायला तयार नाही. तुम्ही हताश होऊन फक्त बघत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

पुढे वाचा

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती! ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

पुढे वाचा

राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’

राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’

प्रवीण विठ्ठल तरडे हे एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील गणपतीची सजावट करताना विद्येची देवता असलेल्या गणनायकाला वंदन म्हणून पुस्तकांची आरास करायचे ठरवले. तशी आरास केली आणि ती करताना इतर पुस्तकांबरोबर गणपतीच्या खाली भारतीय संविधानाची प्रत ठेवली. समाजमाध्यमावर त्यांनी या देखाव्याचा फाटो टाकताच अनेकांकडून त्यांना कडवा विरोध सुरू झाला. ते पाहता त्यांनी त्यांची पोस्ट काढून टाकली आणि जाहीर माफी मागितली. विशेषतः ही माफी मागताना ‘आरपीआय, भीम आर्मी, पँथर अशा काही संस्था-संघटनांची नावे घेत त्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर आपण ती सुधारली आणि दुखावल्या गेलेल्या दलित बांधवांची…

पुढे वाचा

दखलनीय ‘दखलपात्र’!

दखलनीय 'दखलपात्र'!

श्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी? मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते.

पुढे वाचा