मराठी ही सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांत जगात दहाव्या क्रमांकार आहे. असे असतानाही आपल्याकडे ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं सातत्यानं सर्व माध्यमांतून सांगितलं जातं. भाषा नष्ट होतेय का? याबाबतची चर्चा आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1908 साली पुण्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता, ‘मराठी भाषा मृतावस्थेला जाते आहे काय?’ या परिसंवादाचे अध्यक्ष होते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. सर्व मान्यवरांनी भाषेच्या अस्तित्वाबद्दल गंभीरपणे चर्चा केली. त्यानंतर राजवाडे अध्यक्षीय भाषणाला बोलायला उभे राहिले. त्यांनी सांगितलं, ‘‘अरे, भाषा मृतावस्थेला गेलीय का, यावर चर्चा कसली करताय? जर भाषा संपली…
पुढे वाचा