अन्न, वस्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच शिक्षण हेही मूलभूत घटक बनले आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे व्यक्तिची प्रगती होते. चांगले-वाईट यातील फरक कळतो. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. आयुष्य सुखकर बनवण्याचे माध्यम आहे ‘शिक्षण’
पुढे वाचाTag: asmita yende
‘हरवलेलं पत्र’
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवं असतं. संवाद साधायला कुणीतरी हवं असतं. विचारविनिमय महत्त्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘पोस्टमन’. पूर्वी संवाद साधण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते. डाकसेवा सुरु झाल्यामुळे लोक लिहू लागली, पत्र पाठवू लागली, एकमेकांशी संवाद साधू लागली. पोस्टमन…
पुढे वाचाअध्यात्मातून निसर्गसंवर्धनाचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती …’ निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे, लोकाचा, लोकाकरिता, लोकासाठी लिहिणारे संत तुकाराम महाराज हे खरे पर्यावणवादी संतकवी होते. झाडे, झुडूपांनी बहरलेला निसर्ग पाहिला की किती रम्य वाटते! मन प्रसन्न होते. कोणत्याही मोबदल्याविना हा निसर्ग आपल्याला आनंद देत असतो पण आजकाल हे चित्र नाहीसे झाले आहे. झाडांची विनाकारण तोड होत असते. मॉल्स, बिल्डिंग्ज बांधण्यासाठी जंगलांवर कुर्हाड चालवली जाते. त्यामुळे झाडांची संख्या घटते आहे. झाडे आपल्याला स्वच्छ, मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात पण आपणच निसर्गाच्या कामात अडथळे आणतो. वृक्षांच्या तोडीमुळे जमिनी ओसाड…
पुढे वाचा