साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले असले तरी कोल्हटकर, गडकरी यांच्या विनोदाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पूर्वसुरींचे ऋण त्यांनी घेतले होते, जरूर घेतले होते! पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. ही त्यांची यात्रा जशी आयुष्यभर संपन्न झाली तशी या दोघांना करता आलेली नाही. याचे कारण होते प्रकृतीभिन्नता.
पुढे वाचा