महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शहरीकरण झालंय. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आपल्याकडं आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती यासारख्या विशाल महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील चाळीस टक्केपेक्षा अधिक भागाचं शहरीकरण झालेलं आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग ठेऊन काम करणं महाराष्ट्रात शक्य होत नाही. भारतभरातून महाराष्ट्रात लोक उद्योगधंद्यासाठी आणि रोजगारासाठी येत असतात. भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस पुण्या-मुंबईत आहे असं म्हटल्यास तीही अतिशयोक्ती होणार नाही. या सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन महाराष्ट्र पुढे चाललेला असतो. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्रात सर्वाधिक…
पुढे वाचा