वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…
पुढे वाचाCategory: हे जरूर वाचा
Read latest Marathi Featured Articles published in Chaprak Masik or Diwali ank.
वारी एक समाजसंस्कार
परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…
पुढे वाचाअंतर्मुखता हे सामर्थ्य
त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…
पुढे वाचाभाषणांची पन्नास वर्षे!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्या वर्षी आपणही…
पुढे वाचाप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल
सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…
पुढे वाचापेचक
कॅमेर्याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव
जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…
पुढे वाचामुडदा बशिवला मेल्याचा!
कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…
पुढे वाचाकरना है कुछ करके दिखाना है..
चार किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले! बालरोगतज्ज्ञ असलेल्या…
पुढे वाचाअधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे
मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही. गेल्या काही वर्षात…
पुढे वाचा